मोसिन मुजावर विरुद्ध पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Crime

देशाविरुध्द गरळ ओकला
पेण मध्ये सर्वपक्षीय निषेध रॅली

पेण ः-प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पेणच्या काही तरुणांच्या हलगर्जीपणामुळे समाज माध्यमांवर घडला आहे . मोसिन मुजावर या देशद्रोही युवकाचे वडील कित्येक वर्षापुर्वी पेण शहर सोडून सौदीला गेले आहेत. तर मोसिन मुजावर हा आई व बहिणीसोबत मुंबई महानगरामध्ये राहत आहे. परंतू, त्याचे काही लहानपणीचे वर्ग मित्र पेणमध्ये असून त्यांचे आजही या मोसिन मुजावरसोबत संबंध आहेत. यातीलच एक तरुण म्हणजेच आयुष शहा आहे. यांच्यामध्ये इन्स्टाग्राम वर अधूनमधून चॅटींग होते. 5 एप्रिल रोजी मोसिन आणि आयुष या दोघांमध्ये चर्चा झाली त्या चर्चे दरम्यान मोसिन याने देशाविरुध्द इन्स्टाग्राम ऍप वरील आयडी वरून इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो,एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे असे गरळ ओकले.
एकंदरीत मोसिन या तरुणाने देशाविरुध्द चिथावणी देणारे विधान केले असून एकप्रकारे भारत देशामध्ये राहून देशद्रोह केला आहे. त्यातच 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जर मोसिन याने केलेले वक्तव्य खरे असेल तर देशातंर्गत अशांतता माजायला वेळ लागणार नाही. सध्याची स्थिती पाहता अशा तरुणांना वेळेत वेसन घालणे गरजेचे आहे. अन्यथा शांतता व सुवव्यस्थेच्या प्रश्नाबरोबर देशाच्या सुरक्षेेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
त्यातच काल ज्यावेळेला ही बाब पेणमधील काही तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र करुन मोसिन मुजावर या तरुणाचा निषेध केला आहे. तसेच पेण पोलीस ठाण्यात फिर्याद ही नोंदविली आहे. फिर्यादीनुसार मोसिन मुजावरविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 353,1 ख व 353 ( 2 ) गुन्हा दाखल केला असून तातडीने पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सुचनेने व प्रभारी पोलीस निरीक्षक ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मोसिन मुजावर याला पकडण्यासाठी मुंबईकडे रवाना झाला आहे.
असे असले तरी 5 एप्रिल रोजी झालेली बातचीत आयुष शहा याने एवढया दिवस का लपवून ठेवली. याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आयुष शहा याने ही गोष्ट मुद्दामहून लपवून ठेवली की त्याच्यावर कोणाचा दबाव होता. हे ही पाहणे गरजेचे आहे. तसेच भारतात राहून देशाविरुध्द चिथावणी खोर वक्तव्य करीत असतील तर अशांना कोठरातील कोठर कारवाई होउन देशद्रोहाचा गुन्हा देखील तात्काळ नोंदवण्याची मागणी पेण येथील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी केली आहे.