सतरा वर्षांचा महामार्ग… समस्यांचा अंत कधी?

पेणजवळील पाटणेश्वरकडे जाणाऱ्या पुलाला गळती; निकृष्ट कामाचा आरोप, पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह! पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग आणि त्रुटींचं जणू समीकरणच होऊन बसलं आहे. गेल्या तब्बल सतरा वर्षांपासून महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असतानाच आता नवनव्या समस्या रोज समोर येत आहेत. पेण शहरालगत पाटणेश्वर अंतोराकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलाला चक्क गळती लागल्याचे दिसून आल्याने […]

Continue Reading

तरणखोप मार्गावरील भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रातील ‘उत्कृष्ट पूल’!

१०० मीटर लांबीच्या उच्चस्तरीय पुलाची राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी निवड; रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांच्या गुणवत्तापूर्ण कामाचे राज्यभर कौतुक पेण : प्रतिनिधी पेण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या पेण-तरणखोप मार्गावरील इजीमा क्र. ५६ भोगावती नदीवरील १०० मीटर लांबीच्या उच्चस्तरीय पुलाची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘उत्कृष्ट पूल’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पेणच्या शिरपेचात […]

Continue Reading

गणेश विसर्जन घाटाच्या कामाची नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडून पाहणी

पेण : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेण शहरातील भोगावती नदीवरील गणपती विसर्जन घाटाच्या सुरू असलेल्या कामाला नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी आज भेट देऊन पाहणी केली. गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त व्यवस्था उपलब्ध व्हावी, तसेच गणपती आगमनापूर्वी घाटाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून कामाला गती देण्यात येत आहे. भोगावती नदीकाठावरील रुद्र पाटली परिसरात विसर्जन घाटाचे काम […]

Continue Reading

पेणच्या मायणी-कोयना शाळेचा गौरव; शिक्षक रामकृष्ण भोईर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

पेण : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये पेण तालुक्यातील राजिप शाळा मायणी-कोयना येथील शिक्षक रामकृष्ण कृष्णा भोईर यांचा समावेश असून, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

Continue Reading

तरणखोपच्या शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक, महामार्गावरील समस्या सोडविण्याचे अधिकार्‍यांचे आश्र्वासन

पेणःप्रतिनिधी तरणखोप गावालगत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड, सांडपाण्याची व्यवस्था, एसटी बस थांबा तसेच गतिरोधक आदी विविध समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्या तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी तरणखोप ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाकडे उपोषणाचे निवेदन दिले होते. मात्र, प्रांत अधिकारी प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देत ग्रामस्थांनी उपोषणाला […]

Continue Reading

कोंडी टाळण्यासाठी शासनाचा निर्णय; 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान विविध टप्प्यांत निर्बंध

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टन किंवा त्याहून अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. परिवहन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. गणेशोत्सव काळात कोकणात एसटीच्या जादा बसेससह खासगी वाहनांची मोठी वर्दळ वाढते. त्यात […]

Continue Reading

त्याग, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश देणारी बकरी ईद पेणमध्ये उत्साहात साजरी

पेण : प्रतिनिधीमुस्लिम समाजाचा अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी बकरी ईद (ईद-उल-अजहा) पेण शहरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईद हा सण त्याग, श्रद्धा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा मानला जातो. हजरत इब्राहिम यांनी अल्लाहप्रती असलेली निष्व आणि त्यागाची भावना दाखवून दिल्याच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो. समाजात बंधुभाव, प्रेम […]

Continue Reading

शिवशाहीर वैभव घरत यांना पितृशोक

पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारोशी येथील शिवशाहीर तथा रायगड भूषण वैभव घरत यांचे वडील धनाजी महादेव घरत यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धनाजी घरत हे स्वभावाने करारी, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. आपल्या शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठस्वभावामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण […]

Continue Reading

सावित्री नदीपात्रात ७ कोटींचा ‘सागरी’ घोटाळा? महाड-दासगावमध्ये नियम धाब्यावर बसवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा

पेण :-प्रतिनिधी महाड तालुक्यातील दासगाव येथे महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) सुरू केलेले जेटी आणि संरक्षक भिंतीचे काम आता भ्रष्टाचाराच्या मोठ्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणतीही तांत्रिक परवानगी न घेता, जनतेच्या घामाचा ७ कोटींहून अधिक रुपया पाण्यात घालण्याचे पाप अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून सुरू असल्याची खळबळजनक तक्रार समोर आली आहे. […]

Continue Reading