दोन नेत्यांच्या वादामुळे जनता मात्र उपाशिच, राष्ट्रवादीचे आम. रोहित पवार यांची टीका,

Raigad

तुझ माझं पटेने तुझ्या विना करमेना तटकरे णि गोगावलेंची स्थिती
पेण ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी शदर पवार गटाचे आमदार तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांचा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी दैरा सुरू आहे. त्यावेळी पेण येथे आले होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी रायगड पालकमंत्री विषयी विचारणा केली असता त्यांनी रायगडच्या नेतृत्वाला दोष देत सांगितले की, रायगड जिल्हयातील स्थानिक नेतृत्वाचा आपापसातील वर्चस्वाच्या लढाईमुळे रायगडच्या विकासाला खिळ बसली आहे. कारण पालकमंत्री कोण? हाच वाद सध्या महायुती सरकारला मिटवणे कठीण झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होउन अनेक महिने झाले तरी आजतागायत रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही. येथील दोन नेत्यांच्या वादामुळे हा तिढा सुटत नसून त्यांच्या या वादात रायगडकर मात्र उपाशी राहिले असून पालकमंत्री नसल्याने रायगडच्या विकासाला खिळ बसली असल्याचे आमदार रोहीत पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
रायगड जिल्हयाला पालकमंत्री पद मिळत नाही. सर्वप्रथम मंत्रिपदाची रस्सीखेच आणि आत्ता पालकमंत्री पदाची रस्सीखेच येथील दोन नेत्यांमध्ये सुरु आहे. मात्र आपल्या वादामध्ये रायगड जिल्हयाचा विकासाला खिळ घातल्याची खंत रोहीत पवार यांनी व्यक्त केली. पुढे त्यांनी सांगितले की, जिल्हा नियोजिन समितीचा पदसिध्द अध्यक्ष हे पालकमंत्री असतात पालकमंत्री अभावी जिल्हा नियोजनच्या बैठकी होउ शकत नाहीत. त्यामुळे रायगड जिल्हयाच्या विकासात्मक निर्णय घेणे शक्य होत नाही. असे ही पुढे रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितल