भाजप महिला पदाधिकारी यांच्या मुलाचे पराक्रम पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Crime

पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष नरेंद्र म्हात्रे याने पिडीत 15 वर्षाच्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देउन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक उपभोग घेउन अत्याचार केल्याचा पेण पोलीस ठाण्यात 24 फेब्रुवारी 2025 रोजी उशिरा भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023, 64(2)(आय), 64(2)(एम) तसेच बालकाचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, 4,6,8 (पोस्को)नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, यातील पिडीत मुलगी आणि मनिष यांची स्नॅप चॅटवरुन मे 2024 मध्ये ओळख झाली. त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले. ऑगस्ट 2024 मध्ये मनिष याने पिडीत मुलीला तु मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असं बोलून त्याने तिला प्रेमाच्या जाळयात ओढले. नंतर सायन्स विषयाच्या नोटस्‌ घेण्यासंदर्भात ते साई मंदिर पेण येथे भेटले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनिष याने आपल्या चिंचपाडा येथील श्री. शिवाली गृहनिर्माण संस्था येथे घरी बोलावले. आणि तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला तु कोणाला सांगितलेस तर तुझा व्हिडिओ व्हायलर करीन अशी धमकी त्याने तिला दिली व अशाप्रकारे धमकी देण्याचा प्रकार तो वारंवार करु लागला व जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करु लागला. पिडित मुलीने व्हिडिओ व्हायलर होईल या भितीने अत्याचार सहन केला. मात्र 23 फेब्रुवारी 2025 रोजी मनिष याने पिडीत मुलीला धमकावून रात्री साडेअकराच्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले आणि तिला कालव्या मार्गे कासमाळ येथे नेउन तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर अत्याचार करुन शारीरिक संबंध प्रस्तापित केले. ज्यावेळेला मनिष तिच्या घराजवळ सोडविण्यासाठी आला तेव्हा पिडीच्या मुलीच्या वडीलांनी त्याला पहिले तोपर्यंत मनिष हा पिडीत मुलीला सोडून तेथून पसार झाला होता. गेली सहा महिने कशाप्रकारे नरक यातना पिडीत मुलगी सहन करत होती हे तिने आपल्या वडिलांना सांगितले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मनिष याला पिडीत मुलीच्या वडीलांनी त्यांच्या घरी बोलवले त्यावेळेला त्याने मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही. मी तिला अशीच टाईमपाससाठी ठेवली आहे. तुम्हाला काय करायचे आहे ते करा मी घाबरत नाही माझ्या आईची वट वरपर्यंत आहे. असं पिडीत मुलीला व तिच्या वडीलांना धमकावून मनिष हा तेथून निघून गेला. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाणे गाठले. यातील अपराधी मनिष याची आई वंदना म्हात्रे हिने आपल्या राजकीय बळाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक भाजपच्या नेत्यांना खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनी सदरील प्रकरणातून काढता पाय घेतला आणि अपराध्याला शासन व्हायलाच पाहिजे अशी भूमिका घेत. सदरील प्रकरणात पोलीसांनी योग्य ती न्यायाची बाजू घ्यावी. अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली. यातील अपराधी मनिष म्हात्रे याची आई भाजपच्या जिल्हयाच्या कार्यकारणीची पदाधिकारी तसेच जिल्हा शांतता कमिटी सदस्य असल्याने यातील अपराधी आपल्या आईच्या पदाचा गैरवापर करुन पिडीत मुलीप्रमाणे इतरही मुलींवर असा प्रकार केल्याचा तपास अंतमी समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी जिल्हा शांतता कमिटीवरुन आरोपीच्या आईला त्वरीत बडतर्फ करावे अशी मागणी जोरधरु लागली आहे. कारण आपल्या पदाचा गैरवापर करुन आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना म्हात्रे या प्रकरणात ढवळा-ढवळ करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशी चर्चा आत्ता पेणच्या नाक्यानाक्यावर होउ लागली आहे.
दरम्यान पेालीसांनी यातील आरोपी मनिष याला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता 28 फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरिक्षक शिल्पा वेगुंर्लेकर अधिकचा तपास करीत आहेत. दरम्यान तपासाअंती अनेक धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
चौकट
गुन्हा गंभीर आहे आरोपीला जास्तीत जास्त सजा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार ः- पोलीस निरीक्षक, संदीप बागुल
आरोपी मनिष म्हात्रे विरुध्द फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीने केलेला अपराध हा अक्षम आहे. त्यामुळे या गुन्हयातील सर्व बाबी आम्ही तपासून घेत आहोत. या गुन्हयाव्यतिरिक्त इतरही बाजू आम्ही तपासत आहोत. न्यायालयाने आम्हाला 28 फेब्रुवारीपर्यंत मनिष याला पोलीस कोठडी दिली आहे. जास्तीच्या तपासासाठी आम्ही न्यायालयाकडे पुन्हा पोलीस कोठडीची विनंती करणार आणि जास्तीत जास्त सजा अपर्‍याध्याला कशी होईल यासाठी कायदयानुसार दोषपत्र दाखल केला जाईल.
आत्ता चित्रा वाघ आवाज उठवणार का?
भाजपच्या नेत्या तथा आमदार चित्रा वाघ हया महिलांच्या अत्याचाराविरुध्द सतत आवाज उठवत असतात. महिलांचा आवाज म्हणून त्या आख्या महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. मात्र आत्ता त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकारी महिलेच्या मुलाने 15 वर्षाच्या मुलीवर गेली सहा महिने अत्याचार केला आहे. त्याविरुध्द त्या आवाज उठविणार का? असा सवाल जनसामान्य पेणकरांना पडला आहे.