ठेकेदाराची अरेरावी
पेण ः- प्रतिनिधी
पेण तालुक्यात कानसई ते वडखळ टाकण्यात येणार्या उच्चदाब विदयुत वाहिन्या टाकण्यास विरोध असून ठेकेदार राम घरत अरेरावी करत असल्याची तक्रार युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत शेतकर्यांनी प्रांत कार्यालयात केली आहे.
जनशक्ती संघर्ष कोलेटी सामिती यांनी आपल्या जमिनीमध्ये महापारेषणच्या वतीने उच्चदाब विदयुत वाहिनी टाकण्यास विरोध केला असून, या विदयूत लाईन टाकताना शेतकर्यांना कोणत्याही प्रकारे विश्र्वासात घेतलेले नाही या विदयुत लाईन शेतकर्यांच्या जमिनीवरुन गेल्यास भविष्यात शेतीचे मुल्याकंन घटणार असल्याने जनशक्ती संघर्ष समितीने भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील यांची तातडीने भेट घेतली. वैकुंठ पाटील यांनी झालेले प्रकार विचारात घेउन तातडीने उपविभागीय कार्यालय गाठले. उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना सदर शेतकर्यांची करुण काहाणी सांगितली. व तातडीने विदयुत लाईनचे काम बंद करण्याची विनंती केली. तसेच ठेकेदार शेतकर्यांशी अरेरावीने वागत असून ठेकेदार राम घरत हा स्वतः जमिनीचा मालक असल्याच्या तोर्यात शेतकर्यांना अद्वावातद्वावा भाषा वापरत असल्याचे देखील यावेळी शेतकर्यांनी प्रांत कार्यालयात व प्रसार माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. महत्वाची बाब म्हणजे महापारेषणच्या वतीने लोखंडी मनोरे उभे करण्यासाठी काही शेतकर्यांशी आर्थिक व्यवहार केला आहे. परंतू ज्यांच्या जमिनीवरुन या उच्चदाब विदयुत वाहिन्या जाणार आहेत त्यांना विचारणा ही केली गेली नाही. मनमानेल तसा ठेकेदार करत आहे त्यामुळे आज शेतकर्यांनी शासनाचा दरवाजा ठोठावला.
आमचा विदयुत लाईनला विरोध नाही ः- वैकुंठ पाटील, युवा नेता
वैकुंठ पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, येणार्या उच्चदाब विदयुत वाहिनीच्या कामाला आमचा विरोध नाही. परंतू ही विदयुत लाईन टाकताना शेतकर्यांचे नुकसान होणार नाही. याची पुर्ण जबाबदारी महापारेषण विभागाने घ्यावी तसेच ही विदयुत वाहिनी टाकताना धरमतर खाडीच्या बाजूने टाकल्यास शेतकर्यांचे नुकसान होणार नाही. म्हणून पूर्ण लाईनचे काम करत असताना हे खाडीच्या बाजूने व्हावे अन्यथा एक फुट ही लाईन आम्ही टाकू देणार नाही.
संबंधीत कामाची चौकशी करुन तातडीने बैठक बोलवली जाणार ः- उपविभागीय अधिकारी, प्रवीण पवार
प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, काम नक्की काय आहे याबाबत मला काहीही कल्पना नाही परंतू सदरील कामाची माहिती घेउन संबंधीत विभागांना शेतकर्यांबरोबर एकत्र करुन बैठकीचे आयोजन केले जाईल.
जेएसडब्ल्यू कंपनी जो जमिनीचा भाव देतोय तेव्हढा आम्हास दयावा ः- प्रभाकर डाकी, अध्यक्ष जनशक्ती संघर्ष समिती
महापारेषण कंपनीची उच्चदाबाची विदयुत वाहिनी आमच्या शेतावरुन गेल्यास भविष्यात शेतीचे मुल्याकंन घटणार असून, आमच्या शेतीवर कोणतेही प्राजेक्ट राबविता येणार नाही त्यामुळे सदरील विदयुत वाहिनी ही धरमतर खाडीच्या बाजूने न्यावी. अन्यथा सध्या जेएसडब्ल्यू कंपनी ज्या दराने जमिनी खरेदी करीत आहे. तो दर आम्हा शेतकर्यांना दयावा. असे झाले नाही येत्या आठवडयाभरात आम्ही शेतकरी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करु